Breaking – Waves 2025 – विविध सामंजस्य करार
‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

Waves 2025 : नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Waves 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार
मुंबई, दि. 2 – विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् 2025 परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान 1500 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. (Waves 2025)
परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2025 मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत हा करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने 1500 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
या करारावर सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर यांनी स्वाक्षरी केली. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले. (Waves 2025)
-बी.सी.झंवर/विसंअ/
अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर
- कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित
- ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो चित्रपट बनतो ‘भारतीय’: खुशबू सुंदर
मुंबई, दि. 02 : मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे सुरू असलेल्या सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (WAVES 2025) अखिल भारतीय चित्रपट : दंतकथा आथवा चालना असलेले वास्तव (Pan-Indian Cinema: Myth or Momentum) या विषयावर निमंत्रितांचे प्रेरणादायी चर्चासत्र झाले. नमन रामचंद्रन यांनी या सत्राचे सूत्रसंचालक म्हणून भूमिका पार पाडली. यासोबतच नागार्जुन, अनुपम खेर, कार्ती आणि खुशबू सुंदर असे भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रातील चार मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले. या सर्वांनी उपस्थितांना गुंतवून ठेवणारा संवाद साधला.
चित्रपटाची ताकद ही त्यातल्या भावनिक संदर्भांशी जोडलेली असते याचे स्मरण खुशबू सुंदर यांनी श्रोत्यांना करून दिले. भारतातील चित्रपट हे सर्व भारतीयांना आपलेसे वाटावेत, अशा उद्देशानेच तयार केले जातात, त्यामुळेच बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपट उद्योगक्षेत्रात कोणताही भेदभाव केला जाऊ नये, ही बाब त्यांनी ठामपणे अधोरेखित केली. ज्यावेळी तुम्ही आपल्या परस्पर सामायिक संस्कृती, आपली गाणी, आपल्या कथा, आपल्या मातीचा आदर करतात, त्यावेळी तो चित्रपट प्रादेशिक किंवा राष्ट्रीय न राहता ‘भारतीय’ चित्रपट बनतो. यातूनच सर्व गोष्टींचे मूळ एकाच ठिकाणी असल्याचीही जाणिव आपल्याला होते, असे निरीक्षणही त्यांनी मांडले. (Waves 2025)
नागार्जुन यांनीही अशीच भावना व्यक्त केली. त्यांनी आपल्या मनोगत आणि विचारांतून भारतातील चित्रपट निर्मितीच्या परंपरांना एकत्र जोडणाऱ्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा गौरव केला. कथात्मक मांडणीच्या क्षेत्रातील कलाकारांना प्रेरणा देणाऱ्या असंख्य भाषा, चालीरीती आणि भूप्रदेशांबद्दलची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आपल्या मूळ जे आहे, त्याचा अभिमान बाळगल्याने सर्जनशीलतेला कुठेही मर्यादा येत नाहीत, तर त्याउलट यामुळे सर्जनशीलता अधिक मुक्त होत असते, याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. हेच भारतीय चित्रपटांचे खरे सार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. (Waves 2025)
अनुपम खेर यांनी कोविड-19 साथीमुळे सिनेमा पाहण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलाबद्दल सांगितले. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरू लागले, विविध प्रदेशांमधील नव्हे, तर केवळ भारतातील चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढल्याचे ते म्हणाले. आपल्या कलेच्या सादरीकरणात प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. ‘तुम्ही एखाद्या पौराणिक कथेचे मोठ्या पडद्यावर प्रसारण करत असाल किंवा एखादे नाटक दाखवत असाल, तरी कथाकथनातील प्रामाणिकपणाची कधीच तुम्ही साथ सोडता कामा नाही. प्रेक्षकांना नाट्यमयता आवडते, तरीही कथाकथनातील सच्चेपणाला ते नेहमीच दाद देतात आणि चित्रपटात हीच गोष्ट सर्वात प्रभावी ठरते,’ असे ते म्हणाले. (Waves 2025)
याच मुद्द्यावर कार्ती म्हणाले की, प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभवाचे नेहमीच आकर्षण असते. प्रेक्षकांना आज वैविध्यपूर्ण आशय सहज उपलब्ध असूनही, गाणी, नृत्याची जादू, आणि शौर्यगाथा पाहण्यासाठी ते आजही चित्रपटगृहात गर्दी करतात. या चर्चासत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी ‘प्रादेशिक’ चित्रपटांच्या कल्पने पलीकडे जाऊन ‘भारतीय चित्रपट’ ही संकल्पना आत्मसात करण्याचे महत्त्व विषद केले. भावना आणि प्रामाणिकपणाचे महत्व अधोरेखित करून, भारतीय सिनेमाची खरी ताकद विभाजनात नसून, आपल्या मातीत रुजलेल्या एकतेत आहे, आणि हाच वेग भारतीय सिनेमाला पुढे घेऊन जाईल, असे अधोरेखित केले.
‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका
“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” – शिबाशिष सरकार
सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे – एकता कपूर
मुंबई, 2 :-आज मुंबईत आयोजित “जागतिक चित्रपट आणि प्रदर्शन अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका” या विषयावरील मुख्य सत्रात मीडिया आणि कंटेंटचे भविष्य घडवणारे प्रमुख एकत्र आले होते. यात इरॉस नाऊ (एक्सफिनाइट ग्लोबल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम तन्ना; प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशिष सरकार; बालाजी टेलिफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता आर. कपूर; तसेच गुगलच्या अँड्रॉइड टीव्हीच्या उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शालिनी गोविल पै यांचा समावेश होता. (Waves 2025)
भारताच्या कथात्मक मांडणीच्या खोलवर रुजलेल्या परंपरेवर प्रकाश टाकताना, शिबाशिष सरकार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या एक शतक जुन्या प्रवाहापासून आजच्या गतिमान स्ट्रीमिंग व्यासपीठापर्यंतच्या उत्क्रांतीबद्दल माहिती दिली. स्ट्रीमिंग व्यासपीठामुळे भारतीय कथांना जागतिक प्रेक्षक मिळू शकले आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, आशयाचा सीमेपलीकडे खऱ्या अर्थाने प्रवास घडण्यासाठी, भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. संस्थात्मक भांडवल सहयोगासाठी केंद्रित, संपूर्ण भारत या दृष्टिकोनाचे आवाहन त्यांनी केले. (Waves 2025)
आकर्षक कथात्मक मांडणीहे जागतिक यशाच्या केंद्रस्थानी आहे हे अधोरेखित करताना एकता आर. कपूर यांनी कथा जितकी अधिक हृदयाशी जवळ आणि भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असेल तितकीच ती आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी जोडली जाण्याची शक्यता जास्त असते यावर भर दिला. वेदना, उत्कटता आणि आशा यासारख्या भावना सार्वत्रिक असतात, असेही त्यांनी सांगितले. सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परिसंस्थेत दीर्घकालीन व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
जागतिकीकरण हा आजच्या आशयनिर्मितीतील सर्वात परिवर्तनकारी प्रवाह आहे, असे शालिनी गोविल पै यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे वितरणातील अडथळे दूर झाले असून कथात्मक मांडणीचा जागतिक स्तरावरील प्रसार सुलभ झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे निर्मितीची प्रक्रिया वेगवान, प्रभावशाली व माहिती आधारित झाली असून आशयनिर्मितीमध्ये क्रांतिकारक बदल घडवत आहे. भारतीय आशय निर्मात्यांनी पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जागतिक स्तरावर सर्वांना भावतील अशा आशयघन कथांचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक काळात कंटेंट डिस्कव्हरी महत्त्वपूर्ण होत आहे आणि यशाची पुढील लाट स्मार्ट नेव्हिगेशन, डिस्कव्हरेबिलिटी आणि तंत्रज्ञानाधारित कथाकथनावर अवलंबून असेल, असे त्या म्हणाल्या. (Waves 2025)
भारताचा डिजिटल संस्कृतीला सरावलेल्या प्रेक्षकवर्गासाठी आता कथाकथनाच्या रचनेत बदल करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण विक्रम टन्ना यांनी नोंदवले. प्रेक्षकांचा लक्ष केंद्रित राहण्याचा कालावधी कमी होत असून मोबाईलचा वापर वाढत चालला आहे, त्यामुळे नवीन आशयातील आवाज, मतप्रवाह व लक्ष वेधून घेण्याची क्षमता महत्वाची ठरेल, असे ते म्हणाले. यशासाठी तीन महत्वाच्या प्रवाहांचा त्यांनी उल्लेख केला: तंत्रज्ञानाची नवीन परिभाषा, अनुभवाधारित कथाकथन व निष्ठावंत चाहत्यांना आकर्षित करणारे आयपी तयार करणे. जेन ए आय ही आशयनिर्माते व व्यासपीठांसाठी क्रांतिकारक संधी असून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे, उत्पन्न मिळवणे व आवडीनुसार सर्वांना काहीतरी आशय मिळवून देणे यासाठी नवनवीन मार्ग प्रदान करते. (Waves 2025)
भारत जागतिक स्तरावर कंटेंट पॉवरहाऊस अर्थात आशयनिर्मितीची गंगोत्री बनण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. पायाभूत सुविधांमध्ये योजनाबद्ध गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर व मौलिक तसेच गुणवत्तापूर्ण कथा सादरीकरणाप्रती वचनबद्धता असल्यास जागतिक माध्यमांच्या नवोन्मेषात भारत सहज नेतृत्व करू शकतो , असा निष्कर्ष या सत्राच्या शेवटी समोर आला.